औरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने टीम वर्कच्या सहाय्याने नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच कौतुक तर आहेच, पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सर्व यंत्रणा यामध्ये लसीकरण, उपलब्ध खाटा, ऑक्सिजनचा पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासह आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना लसीकरण करुन घेतलेले प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण करण्यामध्ये वाढ होईल. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचा लसीकरणामध्ये आतापर्यंत महत्वपूर्ण योगदान राहिले असून यापुढेही त्यांच्या सहकार्याने लसीकरण पूर्ण करण्याबाबत आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे, असेही निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत लोकांची गर्दी होईल अशा ठिकाणी प्रतिबंध आणि काही बंधने घालण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे मास्क वापरण्याबाबत सूचनांसह ‘ब्रेक द चेनचे’ पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर त्याचप्रमाणे प्रशिक्षित आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देशही दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेड्स उपलब्धतेनुसार स्थानिक प्रशासन निर्बंधाबाबत निर्णय घेणार
- ‘यापुढे इमारत दुर्घटनेत कोणी मृत्युमुखी पडले तर..’, उच्च न्यायालयाचा सर्व पालिकांना इशारा
- ‘सरकार पाडून दाखवणारा तो लाल अजित पवारच आहे’ ; आठवलेंचा टोला
- आर्थिक कोंडीमुळे व्यापाऱ्यांना विजबिल माफी देण्यात यावी – जिल्हा व्यापारी महासंघ
- आणखी एका अधिकाऱ्याने टाकला लेटरबॉम्ब; काँग्रेसच्या नेत्यावर केले गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
