Share

‘मंत्रीमंडळातच तांदूळ चोर असतील तर जनता कुपोषित होणारच ना’

Published On: 

मुंबई : निती आयोगाने (NITI) नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (National Multidimensional Poverty Index -MPI) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पोषणापासून वंचित असलेल्या राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या कुपोषित, NITI आयोगाच्या अहवालात हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. ऐकत आहात ना मुख्यमंत्री महोदय? मंत्रिमंडळातच तांदूळ चोर असतील तर जनता कुपोषित राहणारच ना? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत भातखळकरांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रासोबतच या अहवालामध्ये इतर राज्यांतील कुपोषणाबाबत माहिती दिली आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये ३३.६२ टक्के, कर्नाटकमध्ये ३३.५६ टक्के आणि तेलंगणात ३१.१० टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे नमुद आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!