मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने खळबळजनक आरोप केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. रात्री उशीरा पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप ब्लॅकमेलिंग असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर खुलासाही धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केला आहे.
या संपूर्ण घटनेत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली, कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केल्यानं धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं.
त्यानंतर आता या तक्रारदार महिलेने माघार घेत असल्याच्या पावित्र्यात ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे.
Ek kaam kariye aap sab hi Faisal le lijiye ,Bina kuchh Jane agar aap sab our jo mujhe jante hen wo bhi galat arop laga rahe hen to aap sab mil k hi decide kar lo, Mai hi pichhe hat jati hun jaisa aap sab chah rahe ho
— , (@renusharma018) January 14, 2021
Agar Mai galat hun to itne log ab tak kyu nahi aaye mere liye bolne, Mai pichhe hatungi to bhi mujhe apne aap par garv rahega ki pure Maharashtra men Mai akeli ladki lad rahi thi jabki maine kisi party vishesh ka naam tak nahi liya our ab mujhe girane k liye
— , (@renusharma018) January 14, 2021
Our ab mujhe hatane our girane k liye itne logo ko aana pad raha hai, #maiakelivsmaharastra, ab aap sab jo likhna hai likho Baith k, god bless u
— , (@renusharma018) January 14, 2021
त्याच बरोबर तत्यांनी मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत? मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा असं सांगत रेणु शर्माने देव तुमचं भलं करो असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आधी धनंजय मुंडे वर आरोप, मुंढेंच्या राजीनाम्याची चर्चा, कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांची एन्ट्री आणि आता महिलेची माघार त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

