नाशिक : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर झाले असून शिवसेना व भाजप यांच्यात अव्वल स्थानासाठी काटे की टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.
या निकालांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आहे. ‘ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आनंद देणारे आहेत. राज्य पातळीवर झालेली तिन्ही पक्षांची आघाडी तळागाळातील जनतेनं स्वीकारली आहे असा याचा अर्थ आहे. या निकालावरून मी विरोधकांवर टीका करणार नाही. त्यांनी निकालाचा अभ्यास करावा. मनचिंतन, मतचिंतन काय हवे ते करावे’ असा टोला भुजबळांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नामांतरला नुसता विरोध नको तर सत्तेतून बाहेर पडा; आठवलेंचा काॅंग्रेसला सल्ला
- श्रीराम मंदिराकरीता श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाखांचा निधी
- सफारी पार्कला मिळणार ‘ऐतिहासिक लुक’
- बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा
- ‘स्पायडर मॅन स्पायडर मॅन…’ जाणून घ्या का होतोय पंत ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
