नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे. पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात करण्यात आला आहे.
‘काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचे आजच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यावर माध्यमांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी ‘सामना’वर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही कारण मी ‘सामना’ वाचत नाही असे उत्तर दिले. तसेच कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हाला एकदा करावा लागेल असेही ते म्हणाले.
नाना पटोले हे आज सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांचीही बैठकीला हजेरी राहणार आहे. नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत असून, या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला नेण्याबाबत अदानींचा खुलासा, म्हणाले..
- ‘..हा तर मुंबईचे अहमदाबाद करण्याचा डाव!’, विमानतळ मुख्यालय हलवल्याने शिवसेना संतप्त
- मुंबई विमानतळ ताब्यात येताच अदानींनी मुख्यालय अहमदाबादला हलवले
- ‘तुम्ही ‘गरबा’ कराल, तर आम्हालाही ‘झिंगाट’ दाखवावा लागेल’, मनसेचा अदानींना इशारा
- दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यरची आणखी एका स्पर्धेतुन माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
