Share

‘माझा यावर विश्वासच नाहीये की रामभक्त असे करू शकतात…’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात लोनी येथे मशिदीत जात असलेल्या एका मुस्लीम वृद्धाला ५ जून रोजी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल समद असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून हल्लेखोरांनी त्यांचे ऑटोरिक्षामधून अपहरण केले आणि जवळच्या जंगलातील झोपडीत नेऊन त्यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी समद यांना ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्याची बळजबरी करत, त्यांना हातांनी, काठीने मारहाण केली. समद हे पाकिस्तानी हेर असल्याचा आरोपही या हल्लेखोरांनी केला.

दरम्यान या प्रकरणावर राहुल गांधी यांनी भाष्य केले. राहुल यांनी ट्वीटरवर एक बातमी शेअर करत लिहिले की, ‘मी हे मानायला तयार नाही की श्रीराम यांचे खरे भक्त असे करु शकतात, अशी क्रौर्यता माणुसकीपासून दूर आहे आणि ती समाज आणि धर्म या दोघांसाठीही लाजिरवाणी आहे.’

https://twitter.com/RahulGandhi/status/1404753391750762496

प्रभू श्रीरामांच्या नावाखाली दिलेल्या हा धोका म्हणजे
राम मंदिर संस्थानाने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जागेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपावर टीकेची तोफ डागली. प्रभू श्रीरामांच्या नावाखाली दिलेल्या हा धोका म्हणजे अन्याय आहे असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रभू श्रीराम हे स्वतः न्याय, सत्य आणि विश्वासाचं प्रतिक आहेत. त्याच्या नावाखाली दिलेला हा धोका म्हणजे जणू पापच आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे तसंच त्यांनी मंदिरासाठी जमीन खरेदी करताना मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोपही केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!