Share

‘उलट्या काळजाचे खंडणी सरकार अजून किती एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेणार?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. अशातच धुळे शहरातील संजय सोनवणे या एसटी बस वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. याला अनुसरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’धुळे शहरातील संजय सोनवणे या एसटी बस वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त आहे. बडतर्फी, निलंबन, मेस्मा अश्या जीवघेण्या धमक्या देऊन संप मिटवू बघणारे हे निर्दयी, उलट्या काळजाचे खंडणी सरकार अजून किती एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे?’, असा सवालही भातखलकरांनी केला आहे.

दरम्यान, गुरुवारी संजय सोनवणे यांना विभागीय कार्यालयातून बढतीच्या पडताळणीसाठी हजर राहण्याबाबत फोन करण्यात आला होता. एकीकडे मेस्मा अंतर्गत कारवाईची बातमी आणि दुसरीकडे कार्यालयातून आलेला फोन यामुळे सोनवणे तणावात असून या तणावामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!