🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा फटका मुंबईला सर्वाधिक बसला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे धारावी-गोवंडी सारख्या झोपडपट्टीत येत असल्याचे समोर आले आहे. अतिशय दाटीवाटीचा परिसर असल्याने या भागात ठरवून देखील सोशल डीस्टंंन्सींग पाळल जात नाही. मात्र आता धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
#धारावी_पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
आर्थीक उलाढाली ला सुरवात होईल
व्हेंटिलेटरवर असलेला बांधकाम उद्योग ला जीवन दान मिळेल
मुंबई ला एका बुस्टर डोस ची गरज आहे तो #धारावी_पुनर्विकास असेल
मी ह्या बाबत @OfficeofUT ह्यांना पत्र लिहिले आहे— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 20, 2020
त्यात असे लिहिले आहे की, लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुर्नःविकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही. धारावीच्या विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. अशा परिस्थितीत धारावीच्या पुनःविकासाचा निर्णय घेतला तर तो फायद्याचं ठरेल.
धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. त्याचप्रमाणे यावेळी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोरोनामुळे थांबलेल्या आर्थिक उलाढालीला पुन्हा सुरवात होईल, या निर्णयामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवन दान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे तो धारावी पुनर्विकास असेल असं या पत्रात मांडण्यात आलं आहे.


