Share

Video- काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांत भिडले, मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की

Published On: 

औरंगाबाद- विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश (NSUI)च्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना औरंगाबाद विभागात मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून, घोषणाबाजी करत हुसकावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.

औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सागर कैलास साळुंखे हा प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे . महाविद्यालयांमध्ये सुट्ट्या असताना देखील मोठ्याप्रमाणावर मतदानासाठी युवक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र कोणतीही माहिती न घेता,प्रदेशाध्यक्ष पदाचे दुसरे उमेदवार आमीर शेख याच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून, घोषणाबाजी करत हुसकावून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आमीर शेख हा विश्वजित पतंगराव कदम यांचा पुण्यातील अत्यंत जवळचा कार्यकर्ता  असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  गांधी-नेहरू यांच्या अहिंसा आणि लोकशाही मुल्यांचा टेंभा मिरवणाऱ्या कॉंग्रेसपक्षाची सर्व नितीमुल्ये अक्षरशः पायदळी तुडवल्याचे चित्र आज अवघ्या महाराष्ट्राला पहायला मिळाले.

झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून पराभव समोर दिसत असल्याने आमीर शेख यांच्या कार्यकर्त्यांकडून असे प्रकार घडवून आणले जात आहेत.– सागर कैलास साळुंखे,प्रदेशाध्यक्ष पदाचे उमेदवार 

पहा व्हिडीओ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!