नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरून सातत्याने विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. देशाच्या आर्थिक स्थिती, इंधन दरवाढ तसेच कोरोनाची परिस्थिती याला जबाबदार केंद्र सरकार आहे.असे विरोधक आरोप करतात. तसेच मोर्चे, आंदोलन देखील देश भारात होतात. कधी बैलगाडी आंदोलन व कधी क्रिकेट पटूच्या शैलीत १०० रुपये पेट्रोल झाल्यावर केलेले आंदोलन आपण पाहतो. विरोधी पक्षाचे अनेक नेते यावर सोशल मीडियाद्वारे भाष्य करत असतात.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दरवाढीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या बातमीला अनुसरून ते म्हणाले की, ‘एकीकडे ते कर्ज घेण्यास जनतेला प्रत्साहित करत असतात आणि दुसरीकडे ते कर वसुलीद्वारे अंधाधुंध कमावत आहेत. हे सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लोभी सावकार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
एक तरफ़ जनता को लोन लेने को उकसा रहे हैं,
दूसरी तरफ़ टैक्स वसूली से अंधाधुंध कमा रहे हैं।सरकार है या पुरानी हिंदी फ़िल्म का लालची साहूकार? #TaxExtortion pic.twitter.com/cqW9uF7Ubp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2021
तर दुसरीकडे पिगाससद्वारे हेरगिरी किंवा फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर केंद्र सरकारनेही या आरोपांवर संसदेत स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी सरकार राज्यघटना आणि कायद्याची हत्या करत आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. मोदी सरकार बेडरूममधल्या गुजगोष्टीही ऐकत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्याने काँग्रेसमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’
- ‘सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही’, काँग्रेसचे स्पष्टीकरण
- मोठी बातमी! ‘महाराष्ट्रात काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार!’, राहुल गांधींना भेटल्यानंतर पटोलेंची घोषणा
- ‘महाराष्ट्राचे नविन मॉडेल! उद्योगधंद्यांना बंदी, डान्स बारची चांदी!’
- ‘आता देशाची राजधानी गुजरातला गेली तरी आश्चर्य वाटणार नाही’, काँग्रेसचा भाजपला टोला


