🕒 1 min read
नवी दिल्ली : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे, या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर यांनी हार्दिक पंड्याबद्दल मत व्यक्त केले आहे. प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद अमीरने सांगितले की, ‘हार्दिकला प्लेइंग इलेव्हनचा भाग असावा की नाही? हार्दिक गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळेच त्याच्यावर संघात फलंदाज आणि फिनिशर म्हणून चर्चा होत आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्येही हार्दिक मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करू शकला नाही आणि त्याचा फलंदाजीचा फॉर्मही विशेष नाही. जेव्हा मोहम्मद आमिरला हार्दिक पंड्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘जर हार्दिक गोलंदाजी करतो, तर कोणीही संघात त्याचे स्थान घेऊ शकत नाही, पण जर तो गोलंदाजी करत नसेल तर मला वाटते की आणखी एका फलंदाजाला टीम इंडियाने संघात संधी दिली पाहिजे.
हार्दिक पंड्याला दोन्ही सराव सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकला टी -20 विश्वचषकात फिनिशर म्हणून समाविष्ट केल्याची सतत चर्चा आहे, तर शार्दुल ठाकूर मध्यम वेगवान अष्टपैलू म्हणून टीम इंडियाचा भाग आहे. शार्दुलने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) चमकदार कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- ‘राजकिशोर मोदी यांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होणार’


