Share

‘गीतेंच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही’, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान सेना नेते अनंत गीते यांनी केले आहे. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की,’मला विषय माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. गितेंच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवत आहेत. त्यामुळे सर्वांनीच ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावरही निशाना साधला आहे. शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत. एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करणे म्हणजे सत्तेसाठी तडजोड होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे वक्तव्य गीतेंनी केले आहे. यामुळे उपस्थित आघाडी कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!