मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू होती. खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना मुंबईतील न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले होते. त्याच सोबत राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप देखील त्यांनी केला होता. मात्र तेव्हापासून ते फरार होते.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह सीबीआयला (CBI) न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले.
फरार माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर तब्बल सहा महिन्यांनी मुंबईमध्ये परतले आहेत. मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते गुरूवारी मुंबईत दाखल झाल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी परमबीरसिंहांवर ताशेरे ओढले होते. तुम्ही पोलीस आयुक्त होता म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक मिळणार नाही, असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या:
- केएल राहुलचा पंजाब किंग्जमधून पायउतार; ‘या’ संघाकडून मिळली मोठी ऑफर
- ‘आंदोलन मागे घ्यायचं की चालू ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा’
- गोव्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे कॉंग्रेसला मोठा झटका
- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी
- नवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत कोहलीची विशेष तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

