🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे तर थोड्याफार पाण्याच्या जीवावर मकेचे पिक घेतलेले शेतकरी आता वेगळ्या संकटात सापडले आहेत. जालना जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यानं, पिकाची वाढ खुंटली आहे.
जिल्ह्यात पाच लाख ६५ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची सुमारे ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे, त्यापैकी सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून गाव पातळीवर मार्गदर्शन केलं जात आहे. कृषी विभागानं दिलेल्या सल्ल्यानुसारचं पिकावर कीटकनाशकांची फवारणी करावी, अशा सूचना जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

