Share

राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. नाशिकमधून येत्या २० तारखेला मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा २७ तारखेला मंत्रालयावर येऊन धडकणार आहे. सरकारने कर्ज वसुली मोहीम राबवली आहे तसेच मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असा आरोप अजित नवले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केले आहेत. अहमदनगर येथील राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेत अजित नवले बोलत होते.

यावेळी नवले यांनी शेतकरी मोर्च्याबाबतची कल्पना दिली. आता, सरकारशी धोरणात्मक निर्णयाचा, न्यायालयीन लढाईचा आणि तिसरा टप्पा रस्त्यावरच्या लढाईचा असेल. असा इशारा देखील दिला. तसेच आता, संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय मागे हटायचे नाही.असा निर्धार नवले यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने १८ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावर कोणी ओरडत नाही. त्यांना का कर्जमाफी म्हणून कोणी आक्षेप घेत नाही. मग, शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे का. एकाही उद्योजकाने आत्महत्या केली नाही. इकडे शेतकरी रोज मरत आहेत. शेतकरी आणि उद्योजक दोघेही भारताचे नागरिक आहेत. पण दोघांनाही वेगवेगळा न्याय का.? असा सवाल देखील त्यांनी यावेळी सरकारला विचारला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!