Share

आज शेतकरी संपाचा तिसरा दिवस; शेतमालाची आवक घटली

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आज शेतकरी संपाचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे भाजी -पाला,फळे,धान्य आणि दुधाची शहरांकडे येणारी आवक घटल्याने शेती उत्पादन महागण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दहा दिवसांचा संप पुकारला आहे.शेतकऱ्यांनी  सुरु केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मार्केटयार्डातील भाजीपाला व सर्व प्रकारच्या शेतमालाची आवक घटली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात १० ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे आहे.

राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती व अन्य संघटनांच्या वतीने शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी दिनांक १ ते १० जून अशी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या पहिल्या दिवशी शहरात संपाचा कोणताच परिणाम जाणवला नव्हता. मात्र, आता शेतमालासह फळे तसेच फुलांची आवक घटण्यास सुरुवात झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!