🕒 1 min read
मुंबई : शनिवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे रविवारी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, पाणी तुंबणे, इमारती पडणे याला महापालिका प्रश्नासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी हल्लाबोल केला होता. तर, या दुर्घटनेननंतरही मुख्यमंत्र्यांनी घर सोडलं नाही असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..@OfficeofUT pic.twitter.com/3b0dkBHZlc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021
‘मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. तर, ‘मुंबईतील जीवितहानीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. यानिमित्ताने तरी नालेसफाईतील टक्केवारी व महापालिकेकडून होणारी अक्षम्य हेळसांड यांची उलटतपासणी होईल का?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
- ‘जसा बेस्ट शी.एम तशी बेस्ट महापालिका; सर्वे नंतर सामना म्हणेल आमचीच लाल,’ मनसेचा खोचक टोला
- ओढ विठूरायाची…मानाच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मान संत मुक्ताईचा
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- पृथ्वी शॉचं कौतुक करत शास्त्रींची घेतली फिरकी ; सेहवागचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
