मुंबई : रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यातील स्पर्धकांमुळे ही चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम याने या शोवर निशाणा साधत इतकी देखील स्तुती करू नका की ते बिघडतील असा सल्ला शोच्या मेकर्सला दिला आहे.
सोनू निगमने एका मुलाखतीत म्हणाला की, ‘आपल्याकडे परीक्षक हे स्पर्धकांना काही तरी शिकवण्यासाठी असतात. परीक्षकांनी स्पर्धकांना प्रामाणिकपणे त्यांचे मत सांगणे अपेक्षित असते. सतत स्पर्धकांचे कौतुक करण्यात काहीच अर्थ नसतो. परीक्षकांनी सतत स्पर्धकांचे वा वा म्हणत कौतुक करून कसे चालेल? असे करणे म्हणजे मुलांना बिघडवण्यासारखेच नाही का? परीक्षकांना मुलांना बिघडवायचे नाही तर घडवायचे आहे. परीक्षक सतत स्पर्धकांचे कौतुक करत राहिले तर स्पर्धकांना ते कधी चुकले ते कधी कळणारच नाही.’ असे सोनुने सांगितले आहे.
याआधी या शोमधील पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल खोटा असल्याचे समोर आले होते. तसेच या शो मधील दोन स्पर्धकांना बाहेर काढण्याची देखील मागणी करण्यात आली होती. या शोचे असे एक ना अनेक या किस्से समोर येत असल्याने हा शो टीआरपीसाठी पुढे काय काय करतील सांगता येत नाही असे देखील बोलले जात आहे. यामुळे या श बाबत अनेक लोक संताप व्यक्त करताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
- आषाढीनिमित्त ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड विठुरायाच्या चरणी
- वन डे सामन्यात चहलकडे शमी-हरभजनच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी
- वा रे वा…गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात आणि मुख्यमंत्री थेट पंढरपुरात – सदाभाऊ खोत
- गायक महेश काळे यांच्या वडिलांचे दु:खद निधन
- ‘बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ देत’; मनसेच अनोखं साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

