मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार मजला आहे. मुंबई शहरामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. याचाच धागा पकडत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे,’ असा आरोप फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सरकारवर केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांनाही दिलासा दिला. स्थलांतरित मजुरांना लवकरच त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था होईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. मुंबईतली परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेली असं चित्र दिसतं आहे. पहिल्या लॉकडाउनपासूनच धोरणात्मक निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

