🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारला धारेवर धरले. कोरोनाची तिसरी लाट येणारच आहे, अशा परिस्थितीत सरकारने आतापासूनच तयारी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नाही तर कोरोना संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मागणीही राहुल यांनी केली. सरकारला योग्य मार्ग दाखवण्यासाठीच आपण श्वेतपत्रिकेची मागणी करत असल्याचे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना खोचक शब्दांमध्ये सुनावलं आहे. ट्वीट करत इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. ‘ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि करोना बळी आहेत? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेस शासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधात आवाज उठत असून त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे”, असा दावा स्मृती इराणी यांनी केला.
While Gyani Baba is dishing out pearls of wisdom to Honourable Prime Minister, he may like to introspect on the following –
•Where did second wave start? – Congress ruled states
•Which states had huge percentage of India’s cases and deaths? – Congress ruled states
— Smriti Z Irani (@smritiirani) June 22, 2021
या ट्वीटमध्ये त्यांनी खोचक टोला देखील लगावला आहे. “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असं या ट्वीटमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.
• Who demanded decentralization & then did a u-turn?- Congress
• Which states did the worst in terms of vaccination yesterday even as the country created a world record? – Congress ruled states
कहावत है ‘दिया तले अंधेरा’ – समझ जाये तो बेहतर है।
— Smriti Z Irani (@smritiirani) June 22, 2021
सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू
देशातील संशोधकांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यासंदर्भात सरकारला इशारा दिला होता. मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप राहुल यांनी केला. दुसऱ्या लाटेत सरकार अपयशी ठरले. दुसऱ्या लाटेत ज्यांना वाचवता आले असते, त्यांना वाचवता आले नाही. दुसऱ्या लाटेतील मृत्यूपैकी ९० टक्के मृत्यू हे सुविधा नसल्यामुळे झाले आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला, तर कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. देशात सर्वच ठिकाणी बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने उपाय केले नाही. आता देशात तिसरी आणि नंतर चौथी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने आधीच सर्व तयारी करायला हवी, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीचा ‘हा’ निर्णय म्हणजे पूर्ण मराठा समाजाची मुस्कटदाबी करणारा – विनायक मेटे
- दरेकर, महाजन आणि लाड यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली अन् नार्वेकर म्हणाले, यांच्या हाती शिवबंधन बांधा !
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
