🕒 1 min read
मुंबई : कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना लसीकरणात वाढ करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यात आता १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, अशा व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय लस मिळत नाही. मात्र, यातील अनेक गरीब कुटुंबांकडे स्मार्ट-फोन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी वरील मागणी केली आहे. १८-४४ वयोगटातील बहुतांश व्यक्ती गरीब कुटुंबातील असून ऑनलाईन नोंदणीकरता लागणारा स्मार्ट फोन नसल्याने नोंदणीपासून ते वंचित राहतात. त्यामुळे केंद्राने घालून दिलेल्या लसीकरणाच्या नियमावलीत सुधारणा करून लोकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सवलत द्यावी असे मत त्यांनी मांडले आहे.
केंद्र सरकारने घालून दिलेल्या लसीकरणाच्या नियमावलीत सुधारणा करण्याची तसेच लोकांना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्याची सवलत देण्याची गरज असल्याचे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी नोंदवले आहे.@AjitPawarSpeaks #Vaccination #Maharashtra pic.twitter.com/etN61pLHIz
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 3, 2021
केंद्र सरकारच्या वतीने १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारशी या बाबत चर्चा करण्याची विनंती देखील आमदार जगताप यांनी आपल्या पत्रात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पत्र सार्वजनिक करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Fact Check : केंद्र सरकारने कोविड-19 साठीच्या लसींची ताजी मागणी नोंदवली नाही ?
- ‘रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ – आ. अतुल सावे
- औरंगाबादेत लसींचा तुटवडा, ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद!
- मुलीची आठवण येते म्हणून आला अन् घटस्फोटीत पत्नीवर अत्याचार केला!
- औरंगाबाद मनपा प्रशासकपदी पांडेय यांना तिसऱ्यांदा बढती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

