औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील बस स्थानकांमध्ये सुविधांचा अभाव आहेच. त्यासोबतच सुरक्षेचाही मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. बस स्थानकांमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल औरंगाबादचे रहिवासी मुकेश भट यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेसह विविध सुविधांबद्दल या याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. भट्ट यांनी याचिका दाखल करताना औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून काही महिन्यांपूर्वी एका खाजगी एजंटने पाचशे रुपयासाठी एखाद्या विद्यार्थ्याचे अपहरण करून खून केल्याचा संदर्भ दिला आहे. महामंडळाच्या बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी यासाठी विभागीय नियंत्रकांकडे अर्ज केला आहे.
पण त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. असे भट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील सर्वच स्थानकांवर सुरक्षेचा अभाव आहे. अनधिकृत खासगी ट्रॅव्हल एजंट्सचा नागरिकांना त्रास होतो. हे एजंट प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसमध्ये जाणार जाण्यापासून थांबवतात. बस स्थानकाच्या आवारात सुरक्षारक्षक नसतात. असे अनेक मुद्दे भट्ट यांनी याचिकेत नमूद केले आहेत. त्यांच्याकडून ॲड. अक्षय लोहाडे व ॲड. संदेश हंगे काम पाहत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दरडग्रस्त तळीये गावाचे तात्पुरते स्थलांतरण, विजय वडेट्टीवारांची माहिती
- गडचिरोलीचा ‘प्रोजेक्ट मुंबई’ शी करार, आदिवासी लसीकरण ध्येय साधणार, राजेश टोपेंची माहिती
- ‘जेनेलिया सोबत हा काका कोण?’, रितेशने पत्नी जेनेलियाला वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा
- ‘राज्यपाल कोश्यारींसारखा भला माणूस मी पाहिला नाही!’, अमृता फडणवीसांचे गौरवोद्गार
- मोठा निर्णय ! ‘हिट अँड रन’ झाल्यास मिळणार २ लाख रुपये, नितीन गडकरींची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

