Share

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी भाजपचे ‘ठाकरे’ सरकारविरोधात निदर्शने

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी केले. यावेळी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मका, कपाशी, मिरची, अद्रक, मूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वीज बिल थकलेले आहे. ते माफ करावे, मागच्या वर्षीही शेजारील तालुक्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले आणि सिल्लोड तालुक्यात प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ही चूक अधिकाऱ्यांची आहे तर सत्ताधारी अधिकाऱ्यांना तात्काळ का निलंबित करत नाही, त्यांना तात्काळ निलंबित करा शेतकऱ्यांना लवकरात लवकर हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाईची मदत करावी अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!