🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे राज्यात गेली दीड महिना सगळी दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये सरकारचा खूप सारा महसूल बुडत होता. याचमुळे अर्थव्यव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर दारूची दुकाने सुरू करून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रूळावर आणण्याचे प्रयत्न शासनाने केले आहेत.
यानंतर अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे दारू खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सरकारसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
शेलार म्हणतात, ‘केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे’.
केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार,पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम! pic.twitter.com/lVvIjhQCSJ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 4, 2020
दरम्यान, ‘महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार, पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम!,’ असा सल्ला शेलार यांनी राज सरकारला दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
