🕒 1 min read
मुंबई : काल(१७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असणाऱ्या सिव्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. तसेच हा कार्यभार आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,‘नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याची त्यांच्याकडे जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचे आम्ही ठरवले आहे.’ तसेच त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या इतरांना देण्याचे काम दोन-चार दिवसांत पूर्ण होईल, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष असून ते सध्या उपलब्ध नसल्याने त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. तसेच पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासह करतील’, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- भारताबाहेरही उत्साहाने साजरी केली जाते होळी! जाणून घ्या कोणते आहेत देश…
- “साहेब काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे…”; भाजपचे शरद पवारांना खोचक प्रत्युत्तर
- आमिर खान अनुष्का शर्माची जोडी पुन्हा दिसणार एकत्र? जाणून घ्या…
- पंजाबमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भगवंत मान यांचा मोठा निर्णय!
- “फडणवीसांकडे अक्कल आहे परंतु प्रामाणिकपणा नाही”- हर्षवर्धन जाधव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
