भाजप नेते आशिष शेलार हे उत्तर कोल्हापूर विधान सभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
त्यावेळी बोलताना मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आगामी निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यातील अश्रू हे कोल्हापूरमध्ये निखाऱ्याचं स्वरूप घेतील असं मोठं विधान त्यांनी केलं आहे.