🕒 1 min read
अहमदनगर : केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर आधीच शेतकरी आंदोलनाने दिल्लीत वातावरण तापलेले आसताना आता अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं. अण्णांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजप कडून राज्यासह केंद्रातून प्रयत्न करण्यात आले. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुमारे आठवड्याभरापासून प्रयत्न सुरु केले होते.
मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन शुक्रवारी पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व अण्णा हजारे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन उपोषण मागे घेतल्याची माहिती दिली आहे. यांनतर अण्णा हजारेंनी ‘दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे.’
लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि मा. अण्णा हजारेजी यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे. #AnnaHazare pic.twitter.com/akoaKnNrTP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2021
आधीच्या काही मागण्या केंद्र सरकारने आश्वासन देऊन देखील पूर्ण केल्या नव्हत्या, यामुळे नाराज होऊन अण्णा हजारे यांनी त्या मागण्या व कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ३० जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनापासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पोलीस भरती दोन टप्प्यांत होणार-गृहमंत्री
- ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र कोर्टांसह पथकांचीही नेमणूक करणार-अनिल देशमुख
- अण्णा नेमके कोणाच्या बाजूने?; शिवसेनेचं अण्णांवर टिकास्त्र
- नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत – नवाब मलिक
- ‘जनमताचा स्पष्ट कौल विश्वासघाताने नाकारण्या एवढे तुम्ही नक्कीच नतद्रष्ट आहात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

