Share

शाबाश ! महिंद्रा समूहाकडून कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ, आनंद महिंद्रा यांचं होतंय कौतुक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशातील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारला मदतीचा हात देऊन पहिले उद्योजक म्हणून आनंद महिंद्रा यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे सर्व स्तरातून त्याचं मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी कोरोना संकटामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, महिंद्रा रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचं १०० टक्के वेतनही मदत म्हणून देणार आणि करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असल्याचं महिंद्रा यांन सांगितलं.

दरम्यान, आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन आणि सैन्यदलास मदत करण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांंगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

‘महामारी रोग तज्ञांच्या विविध अहवालांवरुन असे दिसून येते की भारत संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या जवळ आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतात आणि उपलब्ध वैद्यकीय पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडेल  (१/५ )

पुढील काही आठवड्यांतील लॉकडाउन  वैद्यकीय सेवेवरील उच्च दबाव कमी करण्यास मदत करेल. तथापि, आम्हाला बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आमच्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे. (२/५)

या अभूतपूर्व धोक्याच्या प्रतिकारासाठी मदत करण्यासाठी आम्ही महिंद्रा ग्रुपमधील त्वरित आमच्या उत्पादन सुविधामध्ये  वेंटिलेटर कशा बनवू शकतो यावर काम सुरू करू.  महिंद्रा रिसॉर्ट्स आम्ही तात्पुरत्या आरोग्य सुविधांसाठी देण्यास तयार आहोत. (३/५ )

आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा उभारण्यात शासन / सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे. – महिंद्र फाउंडेशन व्हॅल्यू चेन नुकसान झालेल्या (लघु उद्योग आणि स्वयंरोजगार) मदत करण्यासाठी एक निधी तयार करेल.(४/५ )

आम्ही आमच्या सहयोगींना निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू. मी यामध्ये माझ्या पगाराच्या १०० % दान करीन आणि पुढच्या काही महिन्यांत मी त्यात आणखी भर घालीन आमच्या सर्व व्यवसायांना इकोसिस्टम्समध्ये सर्वात जास्त फटका बसलेल्यांसाठी देखील योगदान द्यावे अशी आमची विनंती आहे (५/५)

दरम्यान काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही महिंद्रा याच्यावर कौतूकाची थाप टाकली आहे. ‘मी आनंद महिंद्रांना किशोरवयीन असल्यापासून ते हार्वर्डमध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासून ओळखतो. पण हे ट्विट वाचण्याआधी मला त्यांचा इतका अभिमान कधीही वाटला नव्हता तेव्हा…आपल्या देशाला व्यवसाय क्षेत्रासह, जीवनातही अशाच दूरदृष्टी नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. शाबाश, अशा शब्दात त्यांनी कौतूक केलं आहे.’

हेही पहा – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!