मुंबई : कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आणि सामान्य माणूस हतबल. अशा स्थितीतही निष्क्रीय असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अडीच लाख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे हे अभिनव आंदोलन केले.
मात्र या आंदोलनावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्र पाण्यात बुडत असतांना ज्यांनी शांतपणे पहिला, संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला, शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा ! राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग… ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’. अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे.
महाराष्ट्र पाण्यात बुडत असतांना ज्यांनी शांतपणे पहिला,संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला , शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा !
राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग
"कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते."— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 22, 2020
तर दुसरीकडे भाजपच्या या आंदोलनावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. आज एका मोठ्या पक्षाच्या युनिटने खलाच्या पातळीचे राजकारण करून मोठा जागतिक विक्रम केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जग राजकारण, व्यक्तिगत वाद आणि हेवेदावे विसरून एकमेकांना मदत करत आहे. मात्र हा एक असा पक्ष आहे ज्याने राजकारण करत समाजात भीती, द्वेष, आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष राजकारणासाठी राज्या वर आलेली महामारी विसरला आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.
One political party state unit has set a new low and a new world record- the only party in the world to indulge in politics and in spreading fear, hate and division when the world has forgotten all of it to help each other. This party has forgotten the pandemic.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 22, 2020
दरम्यान, राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने धडाडीने पावले टाकून प्रभावी उपाययोजना करावी तसेच रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार आणि शेतकरी यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करावे या दोन प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्याची मागणी भाजपने दिली आहे. कोरोनाच्या संदर्भात सर्व नियमांचे पालन आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग हे आंदोलनाचे वैशिष्ट्य होते. अस देखील भाजपने म्हंटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

