नवी दिल्ली : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी अंबाती रायुडूला चेन्नई सुपर किंग्जमधून सोडण्यात आले आहे. चेन्नई (CSK) संघातून अनेक मोठी नावे बाहेर पडली आहेत. यातच अंबाती रायुडूचे (Ambati Rayudu) देखील नाव आहे. दरम्यान, अंबाती रायुडूने अजून पुढील तीन वर्षे खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आणि त्याला आशा आहे की चेन्नई सुपर किंग्ज संघात त्याचा समावेश होईल.
पीटीआयशी बोलताना रायडू म्हणाला की, “जोपर्यंत मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तंदुरुस्त आहे तोपर्यंत मला खेळायला आवडेल. मी पुढील सायकलसाठी तयार आहे, जे तीन वर्षांचे आहे आणि मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. अलीकडेच मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलो जेथे सहा दिवसांत पाच सामने झाले आणि मला ते चांगले वाटले. मी चांगल्या स्थितीत आहे आणि पुढील तीन वर्षे तरी मला खेळायचे आहे.
तो पुढे म्हणाला की 2019 चा विश्वचषक माझ्यासाठी निश्चितच निराशाजनक होता, कारण मी संघात नव्हतो. माझे पुनरागमन सीएसकेला समर्पित होते आणि त्यांनी मला त्या टप्प्यात आणि वेळेत मदत केली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
विशेष म्हणजे २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत अंबाती रायडूची संघात निवड झाली नव्हती. नंतर शिखर धवन बाद झाल्यावर ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला, मात्र रायडूचा संघात समावेश करण्यात आला नाही. यानंतर मोठा गदारोळही पाहायला मिळाला. रायुडूचा संघात समावेश न करण्याचा निर्णय अनेकांनी चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाल्यानंतर रायडूने अनेक सामन्यांमध्ये दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावले होते. मेगा लिलावात रायुडूला संघात परत घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

