🕒 1 min read
मुंबई: राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला आहे. दरम्यान राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोणाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. यामध्ये आता एमपीएससीच्या उमेदवारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो.#mpscexam #mhuexam
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2021
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘सध्याची करोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो’. असे ट्विट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे स्वप्न’
- सामन्यापूर्वी विराटाचे ट्विट ; मुंबई इंडियन्सला सावधगिरीचा इशारा
- मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी ; आजपासून रंगणार आयपीएलचा थरार
- जालना – नांदेड समृद्धी जोडमहामार्गाच्या द्दष्टीने हालचाली सुरू : अशोक चव्हाण
- श्रेयस अय्यरची सर्जरी यशस्वी ; फोटो शेयर करत म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
