Share

सरकारमधील विसंतगीमुळेच बाप्पांच्या विसर्जनात विघ्न : सचिन अहिर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे मुख्यमंत्री एक म्हणतात तर शिवसेनेचे पक्षप्रमुख एक म्हणतात. राज्य सरकारमधील विसंगतीमुळेच बाप्पांच्या विसर्जनात विघ्न येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष, माजी मंत्री सचिन अहिर यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं हा निकाल जाहीर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना अहिर यांनी हा आरोप केला आहे.

पुढे बोलताना गणेश मंडळांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जावून जाब मागावा असे आवाहन सचिन अहिर यांनी गणेश मंडळांना केले आहे. या प्रकरणात तोडगा काढण्यास सरकारलाच रस नाही आहे. सरकार कोर्टात नकारात्मक भूमिका मांडत आहे. सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच कार्टाने हा निर्णय दिला आहे असे अहिर म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!