🕒 1 min read
India vs Pakistan । नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. सर्वजण टी-२० विश्वचषकाची वाट पाहत असल्याचे त्याने सामन्यापूर्वी सांगितले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खास आहे. खेळाडू या क्षणांसाठी जगतात. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना असेल. दोन्ही संघांना स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.
गेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली संघाचा कर्णधार होता. त्यानंतर भारतीय संघ सुपर-12 मधून बाहेर पडला. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला होता. विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी विराट मेलबर्नला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट लाइव्ह’मध्ये कोहलीने त्याच्या आणि रोहित शर्मामध्ये असलेल्या समानतेबद्दलही सांगितले.
कोहली म्हणाला, “आमची चर्चा नेहमी आपण मोठ्या स्पर्धा कशा जिंकायच्या यावर असते आणि मग आमचे नियोजन आणि तयारी त्या दिशेने जाते. मी संघात परतलो तेव्हापासून वातावरण खूप चांगले आहे. हेच संघातील निरोगी वातावरण आहे, मग तुम्ही काहीही करायला तयार आहात, त्यामुळे आमची खेळाबद्दलची समज आणि दृष्टी नेहमीच सारखीच राहिली आहे. आम्ही नेहमीच सर्व उणीवा झाकण्यासाठी काम करतो, मग त्या कितीही लहान असोत, असं तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
- Gold Silver Price | दिवाळीपूर्वी सोने-चांदी चे झाले स्वस्त, जाणून घ्या
- Nitesh Rane | “…त्यापुर्वी आदित्य ठाकरेंनी पुरुषाच्या आवाजात बोलून दाखवाव”, नितेश राणेंची बोचरी टीका
- Abdul Sattar | “शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने”; अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला
- IND vs Pak | भारताची भेदक गोलंदाजी! पाकिस्तानच्या १० ओव्हरमध्ये २ बाद ६० धावा
- India vs Pakistan । सूर्यकुमार यादवबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य, म्हणाला….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
