Share

Sanjay Raut । “संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आणि अवैध” ; मुंबई हायकोर्टाची मोठी टिप्पणी

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut । मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे, अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला. ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने निर्णय देत ईडीला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) खूप महत्त्वाची टिप्पणी केलीय. संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

ईडीने स्वत:च्या मर्जीने आरोपी निवडले असल्याचं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय. ईडीने संजय राऊतांना कोणत्या कारणाने अटक केली? ईडीकडे कारणच दिसत नाही,  मुख्य आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना मोकाट सोडलं आणि संजय आणि प्रवीण राऊत यांना अटक कशी केली?, असा सवालही हायकोर्टाने केला आहे.

हा वाद पूर्णपणे दिवाणी आहे, पण त्याला मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हा असं लेबल ईडीने लावलं. अशी लेबल लावून तुम्ही निष्पाप व्यक्तीला गुन्हेगार ठरवून तुम्ही तुरुंगात डांबू शकत नाही अशा परिस्थितीत जे योग्य आहे तेच कोर्टाला करावं लागेल, मग तो समोर कोणीही असो, असं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!