🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना ‘रोखठोक’ सदरातून केला आहे.
शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करीत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत, हे शिंदे यांनीच उघड केले. भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील ‘मेरिडियन’ हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘फुटीर’ आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली.
सुरतवरून हे बिरहाड खास विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिन्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिन्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था करण्याचे कारण काय? दुसरे महत्त्वाचे, बिन्हाड गुवाहाटीत पोहोचल्यावर काही आमदार मुंबईतून निघाले ते थेट गुवाहाटीला न जाता आधी सुरतला गेले. तिथून गुवाहाटीला गेले. ते रहस्य काय? सही सवाल करत संजय राऊत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sambhaji Chhatrapati : “राजदंड ही शोभेची वस्तू नसून लोकसेवेचे…”, संभाजी छत्रपतींचे ट्वीट चर्चेत
- Atul Bhatkhalkar : “बापाच्या नावावर मत मागण्याचे दिवस…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Chitra Wagh : “…आता रश्मी वहिनींच्या पडद्यामागून लढाई करणार”, चित्रा वाघ यांचा टोला
- Chitra Wagh : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणारे…”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
