Share

‘भारतातही नसीरुद्दीन सारख्या…’, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : धर्म संसदेत साधु संतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,’हा सर्व प्रकार म्हणजे एकप्रकारचे गृहयुद्ध आहे. २० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशा प्रकारे संपवण्याची गोष्ट करू शकत नाही.’

तसेच पुढे ते म्हणाले की,’मुघलांविषयी सतत बोलले जाते. मात्र मुघलांचे खूप योगदान आहे, ही बाब ते लोक विसरतात. मुघलांनी इथे स्मारकं, संस्कृती, नृत्य, शायरी, चित्रकला, साहित्य यांसोबतच अनेक गोष्टी दिल्या आहेत. इथे निवास करण्यासाठी ते आले होते. आपण त्यांना निर्वासित म्हणू शकतो. होय, ते निर्वासितांप्रमाणेच होते’, असे वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.

दरम्यान, नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’अगदी खरंय, मुघल राष्ट्र निर्मातेच होते, त्यांनीच रचलेल्या पायावर इथे पाकिस्तान आणि बांग्लादेशची निर्मिती झाली . उर्वरित भारतातही नसीरुद्दीन सारख्या अवलादी शिल्लक आहेत’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!