Share

जनतेशी दादागिरी, त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे. दरम्यान, मनसेने मात्र या बंदला विरोध केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मनसेवर टीका केली होती. लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे.

अमेय खोपकर म्हणाले की, शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा. निषेध म्हणून दोन तास अधिक काम करा. जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच. जनतेच्या जीवाशी खेळ करून राजकारणाची पोळी भाजण्याचा महाभकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारून राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!