🕒 1 min read
जालना: राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र आता काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील असच काहीसे दिलासादायक चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ७०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. योग्य उपचाराने कोरोनावर मात करता येऊ शकते मात्र कोरोना होऊच नये या साठी नागरिकांनी काळजी घेणे आव्स्श्यक आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३०४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. जालना शहरात केवळ ४५ नवीन रुग्ण आढळून आले. मागील पंधरा दिवसांमधील ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असल्याने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या ६६१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये १३ जणांचा कोवीड संसर्गाने मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्या एकूण मृतांची संख्या आता ८१६ झाली आहे.
जिल्ह्यात आज आढळून आलेल्या बाधितांमध्ये जालना शहरासह तालुक्यातील ६३, मंठा तालुक्यातील १८, परतूर तालुका ३३, घनसावंगी तालुक्यातील २६, अंबड तालुक्यातील ४१ बदनापूर तालुक्यातील १३, जाफ्राबाद ५६, भोकरदन तालुक्यातील ३९, तर इतर जिल्ह्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ४९ हजार ११६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेेल्या ७०४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार ७३१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ६६१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ८१६ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात एकूण तपासण्यांमध्ये बाधित रुग्ण आढळू येण्याचे प्रमाण १६.५४ टक्के असून, बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.८९ टक्के इतके आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील ७२३ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
- कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती

