Share

नागरिकांच्या जिवाला धोका असणारी गुंडांची टोळी हद्दपार

Published On: 

परभणी : शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांची जीवित वा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्ये, दुखापतीसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रानिशी मारहाणीसह दंग्याचे प्रकार सातत्याने करणाऱ्याया गुंडांच्या टोळीस जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

यामध्ये टोळीप्रमुख लक्ष्मण गायकवाड, अनिल गायकवाड यांना सहा महिने तर टोळी सदस्य सुरेश पवार, आकाश जाधव यांना तीन महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या टोळीस जालना तसेच माजलगाव येथे नेऊन सोडण्यात आले आहे.

या टोळीतील सदस्यांनी २०१४ पासून आजतागायत लक्ष्मण गायकवाड, अनिल गायकवाड, सुरेश पवार, आकाश जाधव, दिलीप जाधव, मारोती जाधव, करण जाधव, शिवाजी जाधव आदी सदस्यांमार्फत वैयक्तीक तसेच एकत्रित गुन्हे घडवून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवितास, मालमत्तेस धोका निर्माण केला. या टोळीविरूद्ध एकूण १३ गुन्हे दाखल झाले आहेत. नवनवीन सदस्यांना टोळीत सामावून घेत गुन्हे करण्याचे टोळीचे कृत्य नेहमी सुरू होते.

दरम्यान चार महिन्यांच्या कालावधीत पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विलास मुंडे, नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नितेश उर्फ भैय्या प्रकाश देशमुख यांच्या टोळीतील टोळी प्रमुखांसह दहा सदस्यांना व चालू हद्दपार कारवाईत चार अशा एकूण १४ गुंडांना आतापर्यंत हद्दपार केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!