Share

‘अहो ! आधी तुमची मानसिकता बदला, मग दुसऱ्यांना सल्ला द्या’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशासह राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं पुन्हा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे.

कोरोनाशी लढा संपलेला नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.

दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. ‘१० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे (????) मुख्यमंत्री. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी… मग दुसऱ्यांना सल्ला द्या’, अशा आशयाचे ट्वीट करत भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोरोना काळात उद्धव ठाकरे फारसे जनतेमध्ये मिसळेलेले पाहायला मिळाले नाहीत. प्रत्यक्षरित्या त्यांचा जनतेशी संपर्क कमी होता. मुख्यमंत्री फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस थेट फिल्डवर जाऊन जनतेचे प्रश्न सोडवत होते. याचाच संदर्भ घेत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!