चेन्नई : एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा आज (९ फेब्रुवारी) पाचवा दिवस आहे. या दिवशी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईत पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. भारताने विजयी आव्हानाचं पाठलाग करताना 100 धावांच्या आतच 4 विकेट्स गमावल्या आहेत.
इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने आणि जॅक लीचने प्रत्येकी विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनने गिल आणि रहाणेला बोल्ड आऊट केलं आहे. यामुळे आता विराट कोहली आणि रिषभ पंतकडून आशा आहेत. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून या भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले’
- ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’
- माझ्यावर केलेली कारवाई राजकीय दबावापोटी: नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
