Share

#Coronavirus : कोरोनाच्या दहशतीखाली इराणमध्ये अडकलेले २३६ भारतीय मायदेशी परतले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाच्या दहशती खाली इराणमध्ये अडकलेल्या 234 भारतीय नागरिकांना सुखरुपपणे देशात आणण्यात आले आहे. यामध्ये 131 विद्यार्थी आणि 103 तीर्थ यात्रींचा समावेश आहे, याबाबत माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसंच या २३६ जणांमध्ये १३१ विद्यार्थी आहेत असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी ४४ प्रवाशांना इराणहून भारतात आणलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत एकूण २३६ भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आलं आहे.

तसेच इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे जयशंकर यांनी आभारही मानले. करोना व्हायरसमुळे इराणमध्ये १०० जणांचा मृत्यू झाला. तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. अखेर हे सर्व जण मायदेशी परतल्यामुळे चिंता गेली आहे.

दरम्यान, इराणमध्ये शनिवारी कोरोणामुळे जवळपास 100 नागरिकांचा मृत्या झाला. याच बरोबर तेथील मृतांचा आकडा आता 700 वर पोहोचला आहे. येथे जवळपास 13 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!