अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमधून 30 मजूर आणि विद्यार्थी पळाले. बुधवारी सकाळी प्रकार उघड झाला होता. यासर्वांना पातूरातील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात क्वॉरंटाईन करून ठेवलं होतं. प्रशासनाकडून फरार लोकांचा शोध सुरू आहे.
हे सर्व मजूर आणि विद्यार्थी तेलंगानातील असून त्यांचा प्रवास झाला होता त्यामुले त्यांना ३० मार्चपासून पातूरात थांबण्यात आलं होतं. या ठिकाणी या ३० जणांना योग्य त्या सर्व सुख सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस यंत्रणा येथे कार्यरत असूनही ३० जणांनी पळ कसा काढला? असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रशासन आता फरार लोकांचा शोध घेत आहे.महत्वाचं म्हणजे हे सर्व पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्ण नसून त्यांना लॉक डाउन संपेपर्यंत किंवा पुढील आदेशपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं होत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

