🕒 1 min read
मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध संप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दोन विक्रमाच्या अगदी जवळ पोहचला आहे. यातील पहिला विक्रम आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम. विराटने आतापर्यंत भारताकडून ६० सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पण ६० सामन्यात नेतृत्व केले आहे. यामुळे जेव्हा विराट कोहली जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळायला उतरेल तेव्हा भारताकडून सर्वाधीक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार बनेल. जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामना हा विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना असेल.
तर जागतीक कसोटी सामन्यात सर्वाधीक विजय मिळवण्याच्या यादीत विराट कोहलीला क्लाईव्ह लॉईड यांना मागे टाकण्याची संघी आहे. विराट कोहली सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या यादीत क्लाईव्ह लॉईड यांच्यासह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहे. लॉईड यांनीही कर्णधार म्हणून ३६ सामने जिंकले आहेत. तेव्हा भारताने या इंग्लंड दौऱ्यात एकाही सामन्यात विजय मिळवला तरी विराट या यादीत लॉईड यांना मागे टाकेल. या यादीत दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ पहिल्या क्रमांकावर असुन त्याने सर्वाधीक ५३ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉटिंग (४८) आणि तिसऱ्या क्रमांकावर स्टिव्ह वॉ(४१) हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली… मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; जीएसटी उपायुक्तांचा मृत्यू
- श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या ‘या’ गोलंदाजाने केली वसीम आक्रमच्या खास विक्रमाची बरोबरी
- अखेर प्रतिक्षा संपली! मनी हाईस्ट च्या आखेरच्या भागाची प्रदर्शनाची तारीख जाहिर
- पुढील जन्मावर भाष्य करणाऱ्या युवराजला कैफचे मन जिंकणारे उत्तर
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस


