🕒 1 min read
औसा: फडणवीस सरकार नाही; फसवणूक सरकार आहे. विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्ममुक्त केले नाही. बेरोजगारी वाढवली. कारखाने बंद केले. त्यामुळे कुठलाच घटक समाधानी नाही. या सरकारला जनता नाकारेल. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री आमचाच राहिल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वक्त केला.
औसा येथे विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पहिली सभा लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात गांधी यांनी घेतली. या वेळी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. थोरात म्हणाले, सरकार सर्वच घाटक नाराज आहे.काँग्रेस आपल्या विचारधाराने चालते. जनता पुन्हा आम्हला साथ देतील अशीही विश्वास थोरात व्यक्त केला.
तर अशोक चव्हाण म्हणाले, आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी देणार. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना फसवले. आम्ही फसवणार नाही. सध्याच्या सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्यामुळे महाराष्ट्र आता आपल्या हातातून जाऊ देऊ नका, असे चव्हाण यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183346115015348224?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

