Share

‘महावितरण मंडळातील घोटाळे लपविण्यासाठी सरकारकडून…’, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होत आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. दरम्यान, महावितरण मंडळातील घोटाळे लपविण्यासाठी सरकार कडून राज्यात सोयिस्कर चित्र तयार केले जात आहे, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) म्हणाले आहेत.

हिवाळी अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ सदाभाऊ खोत यांनी ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की, ‘राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेती वीज पंपाच्या बाबतीत प्रचंड असंतोष आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आणि वेगवेगळ्या संघटना मोर्चे काढत आहेत. आणि विद्युत महामंडळ ऐन रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांची पिके वाळवतय अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे’, असे खोत म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’या राज्यामध्ये जवळजवळ शेती पंप धारक ४५ लाखांच्या आसपास असून त्यांची थकबाकी जी विद्युत महामंडळाने दाखवली आहे ती ४५ हजार कोटी रुपये आहे. मुळात शेतकरी वीज वापरतो किती तर ३१% आणि वीज गळती १५ % , असे विद्युत महामंडळाच म्हणणं आहे. परंतु प्रत्येक्षात वीज गळती ही ३०% आहे आणि शेतकरी विजेचा वापर फक्त १५% करत आहे. एका बाजूला या महामंडळाचा अंधाधुंदी कारभार,वितरणामधील गळती,त्यांच्या चोऱ्या,भ्रष्टाचार हे सगळं लपवण्यासाठी सोयीस्करपणे एका बाजूला शेतकरी जास्त वीज वापरात आहे अशा पद्धतीचे चित्र निर्माण केले जात आहे आणि त्यांच्या चोऱ्या त्यामध्ये झाकून टाकल्या जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!