मुंबई : सध्या देशात लॉकडाऊन कोरोनाला रोखण्यासाठी सुरु आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडण्याची भिती निर्माण झाली असताना अनेकजण सरकारी मदतनिधीत सढळ हातांनी मदत करण्यास पुढे सरसावत आहेत. यामध्ये अगदी सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, कलाकार, उद्योजक मदतीसाठी पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना गंभीर म्हणतात, ‘पीएम केअर फंडातील निधीसंदर्भातही भाष्य केले. कोरोनाच्या लढ्यात मदतीसाठी पीएम केअर फंडच्या माध्यमातून निधी जमा करण्यात येत आहे. तसेच सामान्य जनतेमधून येणारी एक रुपयांची मदत ही मोलाचे योगदान ठरेल’.
‘कोरोना विरोधातील लढा जिंकायचा असेल तर आपल्याला एकत्रित लढा द्यावा लागेल. एवढेच नाही तर सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे सर्व नागरिकांना पालन करावे लागेल,’ असं आवाहन देखील गौतम गंभीर यांनी केलं आहे.
दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मी रोपांना पाणी घालण्याचे काम करत आहे. पण अद्याप एकही रोप वाढलेले दिसत नाही,’ असं देखील यावेळी बोलताना भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

