🕒 1 min read
लातूर : विदर्भातील सहा जिल्हे डिझेल मुक्त करणार असून त्या ठिकाणी सर्व वाहने इथेनॉलवर चालवणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते काल लातूर इथं बोलत होते. नव्या उद्योग नितीमध्ये ग्रामिण भागातील तरुणांना गावातच उद्योग, रोजगार निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाणार असल्याचं ते म्हणाले. सायकल रिक्षाच्या जागी इ रिक्षा आणून गरिबांची शोषणातुन मुक्तता केली असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
देशाची वाढती इंधन गरज भागवण्यासाठी तथा 8 लाख कोटीचे परकीय चलन वाचविण्यासाठी इथेलाँनची निर्मिती करण्यानासाठी देशातील 300 ते 350 बंद साखर कारखाने इथेनॉल तयार करण्याच्या अटीवर कारखान्याचे पुनर्जीवन करण्यात येईल असं देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ऊसा सोबतच सोयाबीनच्या काडापासुन इथेनॉल तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असुन त्याचे प्रायोगिक तत्वावर विदर्भातील पाच जिह्यात सुरुवात केल्याचे सांगितले. याच धर्तीवर लातूर जिह्यातील इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असणारी सर्वोतपरी मदत आपण करू अशी ग्वाही देत या माध्यमातून जिह्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार प्राप्त होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296831603666945?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296661545570304?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

