🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य केल्यानंतर भाजप पक्षाने शिवसेना पक्षाला तसेच राहुल गांधी यांना धारेवर धरलं. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना खोचक सवाल केला आहे.
यावेळी, वीर सावरकरांनंतर एकमेव हिंदुरुदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, हे आम्हाला रोज सांगण्याची गरज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आम्ही गेल्या 15 वर्षांपासून मागणी करत आहोत, पण अजून दिला नाही, त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच, इतकंच कशाला तुम्हाला एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेब ठाकरे यांनाही पुरस्कार द्या, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, असा आरोप देखील राऊतांनी केला आहे. पण बाळासाहेबांसारखा आणि वीर सावरकर सारख्या महान लोकांचा भारतरत्न किताबाने का सन्मान केला नाही? असा सवाल त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Raosaheb Danve | “लाज वाटली पाहीजे” ; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांवर दानवे संतापले
- IPL 2023 | बेन स्टोक्स आणि मयंक अग्रवाल यांच्यावर SRH लावेल मोठा दाव, आकाश चोपडाचा अंदाज
- Raosaheb Danve | गांधींसोबत जाणाऱ्यांकडून बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव ; दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका
- Saamana | “महाराष्ट्राचा हिमालय! त्यांना ढोंग मान्य नव्हते पण…”, सामनाचा विशेष आग्रलेखातून बाळासाहेबांना अभिवादन
- IPL 2023 | एम एस धोनी नंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार, वसीम जाफरने केले मोठे वक्तव्य


