🕒 1 min read
मुंबई : रिपब्लिकन ही संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेचा विश्वास वंचित वर नसून रिपब्लिकन संकल्पेवर आहे. रिपाइं चे लोकप्रतिनिधी स्वबळावर निवडून येत नसल्याने राजकीय मित्र जोडून आम्ही युतीचे राजकारण करीत आहोत. अमच्या राजकारणावर वंचित चा किंचितही परिणाम होणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
अणुशक्ती नगर विधान सभेचे महायुती चे उमेदवार तुकाराम काते यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने क्रांतिकारक निर्णय घेतले. अनेक चांगली कामे केली. उद्धव ठाकरे हे गोड बोलणारे चांगले नेते आणि माझे मित्र आहेत. उद्भवजींच्या नेतृत्वाखाली तूकाराम काते यांनी अनुशक्तीनगरमध्ये शिवसृष्टी उभारली आहे. त्याचप्रमाणे येथे बुद्ध पार्क उभारण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्ष शिवसेना भाजप महायुती ची अभेद्य ताकद उभी राहिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तुकाराम काते हे 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183355937764962304?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183352423454085125?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183349253772464128?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183348935181553672?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

